पद्धत : समस्थितीत उभे राहा. डाव्या हाताच्या कनिष्ठिका, अनामिका, मध्यमा आणि तर्जनी (अंगठा सोडून असलेली चारही बोटे) या चारही बोटांना गळ्यावर ठेवा. हाताचा तळवा आतल्या बाजूला असावा. उजव्या हाताची तर्जनी डाव्या हातावर उलटी ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. मान याच अवस्थेत स्थिर ठेवून हात बाजूने पूर्वावस्थेत आणा. छातीच्या साहाय्याने २५ वेळा श्वासोच्छ्वास करा. क्रिया समाप्त करून विशुद्ध चक्रावर किंवा गळ्यावर लक्ष केंद्रित करा.
लाभ :
ही क्रिया केल्यामुळे जिथे वात, पित्त आणि कफ एकत्रित होतो, त्या गळ्याच्या सर्व नाड्यांमधील वात, पित्त आणि कफ पोटात जातो आणि स्पष्ट शब्दोच्चारण होऊ लागते.
तोतरे बोलणे किंवा बोलताना चाचरणे यांसारखे विकार बरे होतात. कटू स्वर मधुर बनतो.
संगीतज्ज्ञांसाठी ही क्रिया विशेष लाभदायक आहे.
मेंदूचे विकारही बरे होतात.
विचारशक्तीत वाढ होते.
